घरातल्या नकारात्मक ऊर्जेमुळे येतात आर्थिक अडचणी, कापुराचा हा उपायही ठरेल प्रभावी

[ad_1]

मुंबई, 29 जुलै: आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर होत आलेली कामेही बिघडू लागतात. अशा घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीही ढासळू लागते. छोटासा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो. पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते. कापूराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे.

News18लोकमत


News18लोकमत

कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी तर राहतेच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते. कापूरमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत. याशिवाय ज्योतिषीय उपायांमध्येही कापूरचा भरपूर वापर केला जातो. कापूरच्या वापराने ग्रह आणि वास्तु दोष दूर होतात. कपूरचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात. कापूर संबंधित या खास उपायांबद्दल जाणून घेऊया. Chanakya Niti: लक्ष्मीप्राप्तीसाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती, का नष्ट होते मनुष्याची संपत्ती

 कापूरचा आध्यात्मिक वापर

तुमची कामे वारंवार बिघडत असतील तर कापूरशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळावा. घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते. इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघन जातात. कापूर जाळल्याने घरात सुख-शांती राहते. कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उदाहरणार्थ, आरती करण्यापूर्वी, संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे. घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाका. त्यानंतरच घरी कापूर आरती करावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. म्हणून श्रावण महिन्यात मांसाहार करत नाही, हे कारण माहितीये तुम्हाला? घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो. यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा. एक कापूर संपल्यानंतर तेथे कापूरचे नवीन तुकडे ठेवा. असे काही दिवस सतत करा. कापूरशी संबंधित हे उपाय वास्तु दोष दूर करतात. जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष देखील कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो. यासाठी सकाळी, संध्याकाळ आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा. कापूर संबंधित हे उपाय केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापूर संबंधित उपाय करा. यासाठी अंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका. आता या पाण्याने अंघोळ करा. असे केल्याने शनिदोष दूर होतो. कापूरच्या या उपायाने मार्गात येणारे अडथळे दूर होतात, तसेच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षावही घरात होतो. झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर झोपताना उशीखाली कापूर ठेवा. यामुळे चांगली झोप लागते आणि नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *